शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 26 November 2015

आपण (?)




बरं झालं..

आपण एकमेकांना जाणून घ्यायच्या फंदात पडलो नाही...
ह्या जमान्यात वेळ तरी कुठंय - एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायला ?
एखाद्या व्यक्तीची वाट बघायला ?
एखाद्या व्यक्तीला पत्र लिहायला ?
आपल्या बोटांनी टाईप केलं की पोहोचतंच न समोरच्या डोळ्यांमध्ये ?
मग पत्रं कशाला लिहायची ?

वाट कशाला पाहायची ?

नेटवरून आतापर्यंत किती किती बोललो !
किती मेसेजेस वाचलेकिती डिलीट झाले !
किती smileys पाठवल्याकिस्से share केले

एकमेकांचे सारे ज्ञान एकमेकांना दिले 

पण नातं जेव्हा hang झालं, एक लक्षात आलं
की 'मन सामावणारंनेट आलं नाहीये अजून !
संवादांची range गेलीतेव्हा कळून चुकलं 

की 'भावनांपेक्षा fast' नेट झालं नाहीये अजून !

तुलाही हे कळावं अशी अपेक्षा नव्हती माझी
तुलाही हे कळेलअशी भाबडी आशा होती 
पण तुझं नेट वेगळं - माझं नेट वेगळं !
I mean, तुझं विश्व वेगळं - माझं विश्व वेगळं !
म्हणून,
बरं झालं..

आपण एकमेकांना जाणून घ्यायच्या फंदात पडलो नाही...

No comments:

Post a Comment