शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 14 January 2016

सज्ज व्हा..


काळजाला कापणाऱ्या दूषणांनो - सज्ज व्हा
सज्ज व्हा ! रुधिरास जडल्या शृंखलांनो - सज्ज व्हा

चालण्यासाठी न मर्यादा इथे आहे आम्हां
हद्दरेषा सांगणाऱ्या सज्जनांनो - सज्ज व्हा

आज आम्ही हारलो, माघारलो नाही कधी
दाखवा रोखून आम्हां, वादळांनो - सज्ज व्हा

आजच्या राखेत सामावे उद्याचा फैसला
आणखी आघात देण्या वेद्नांनो - सज्ज व्हा

No comments:

Post a Comment